Sunday, July 24, 2011

वायफळ

मुंग्या ठरवतात .."चला , अमुक ठिकाणची साखर [ त्यांच्या interest चा कोणताही पदार्थ ] गोळा करायला जायचे" , काय त्या काही शे मिळून जातात , नि एका रांगेत दिलेला task पुरा करत साखर आणून बिळात टाकतात .

आपण ठरवतो ..."चला , जेवायला बाहेर जाऊयात", इन मीन चार पाच टाळकी ...जेवायला जायचे तर ठरते ...पण कुठे ह्या वरून "संवाद ते भांडण" ह्यातले प्रसंगानुसार काहीही घडून plan बोम्बलतो .

पण मेंदू प्रगत वगेरे कोणाचा तर माणसाचा!

जसे एका अतिशय श्रीमंत माणसाला हव्या त्या air lines चे ticket मिळाले नाही , आणि मग नाईलाजाने कोणत्या तरी दुसऱ्या company बरोबर fly करावे लागले हा भयानक मोठा problem असू शकतो .
त्याच वेळी एखाद्याला आज रात्री जेवायला भात असू शकत नाही कारण तांदूळ संपलेत हा problem असतो , पण पहिल्या ला त्याच्या problem ची तीव्रता जास्त वाटत ही असेल

माणसाच्या प्रगत नि विकसित वगेरे मेंदू चा लोचा फक्त इतकाच झालाय प्रत्येक मेंदूत [ अनेक , बहुन्तांशी मेंदूत] खयाली पुलाव खूप शिजतात , किंव्हा द्वंद्व , विचारांचे traffic jam वगेरे

म्हणजे ह्या मेंदूचा प्रगत वगेरे होऊन झाला हुशार ससा .......
बाकी कासवे वगेरे ....

पण स्पर्धा कधी असे ससा मेंदू जिंकत नाहीत .

इतके evolution वगेरे होऊन ही माणसाच्या मेंदूला मनाची नाडी फार काळ हाती लागत नाही .एक साधे Delete चे button नाही जमले अजून
काही उदाहरणे

१. अ नि ब चे भांडण

अ ने मुद्दा मांडला
ब ला पटला नाही
अ ने ते मुद्दे योग्य आहेत हे तर्काच्या आधारे पटवून दिले
वाद इथे संपायला हवा , पण बऱ्याचदा ब ते personally घेतो नी ब चा मेंदू उगाच भलत्या दिशेने भरकटत जातो

2. काही वर्षापूर्वी एखाद्या माणसाचा [ I guess सगळ्यांचाच कधीतरी ] खूप बोचरा अपमान झालेला असतो , ती घटना त्याला १०, १५ , २० , 25 वर्षांनी किंवा मरेस्तोवर ही पुसता येत नाही ......त्याचा विचार न करणे किंव्हा सोडून देणे त्याच्या मेंदूला जमत नाही .

३. A ला B आवडायला लागली ....की मग ती मला का फोन करत नाहीये , माझ्या message ला reply का नाही , बहुतेक तिला मी आवडत नसेन , ती मला avoid करत असेल , तिला आणखी कोणीतरी आवडत असेल , ती असे का वागतेय किंवा असे का वागत नाहीये . A च्या मेंदू ला virus लागतो almost .

मेंदू प्रगत वगेरे झाला असेल पण अजूनही productive मार्गाने जाण्याचा मार्ग जाणण्या इतका नाही .......

"मन विरुद्ध मेंदू" , नी "विचार विरुद्ध भावना" ह्यावर कधी न संपणाऱ्या चर्चा होऊ शकतात,पण मग फरक इतकाच राहतो की मुंग्या ठरवतात की आज साखर न्यायची त्या नेतात .
आपल्या हातात रिकाम्या पिशव्यांमध्ये न मावणारे विचारांचे डोंगर .......!

No comments: