Monday, September 17, 2012

Get well soon ! ! !

सगळेच गमतीचं असते !

 म्हणजे निवडणूक प्रचार सुरु होतो नी मतं मिळवण्यासाठी अनेक गोष्टीचं वाटप सुरु होतं ....तेंव्हा राज्यकर्त्यांना मतं दिसत असतात न गरजूंना न ५ किलो तांदूळ. Horn वाजवणाऱ्या रिक्षावाल्याला समोर चे traffic दिसत असतं नी आपल्याला कारण नसताना सतत honking करणारा रिक्षावाला डोक्यात जात असतो . रथाचं चक जमिनीत रुतलेलं असताना कर्णावर सोडलेला बाण काही जणांसाठी भ्याडपणा असतो , कृष्णासाठी ती आवश्यक राजकीय खेळी असते '. चोरी करणाऱ्या कडे त्याची त्याची कारणं असतात आणि चोरी ज्याच्या घरची होते त्याला ही चोराला शिव्या शाप द्यायचा अधिकार असतोच . दुर्दैवानं "योग्य अयोग्य" चं भाबडं जग उरलेलं नाही ...आता ते झालेय subjective , various point of views , perspectives, perceptions चं जग .

इथे मग हर एकाचा आपापला दृष्टीकोन आला , आपापलं म्हणणं आलं , आणि मग इथे ज्याच्या त्याच्या दृष्टीनं बरोबर सगळेच असतात , its the situation, or such are the circumstances ...अशी जबाबदारी चे बोट दुसऱ्याकडे दाखवायला शिकवणारी वाक्य आली . मोठमोठे लोक पूर्वी "होऊन गेले" हे त्यांचे सुदैव च म्हणलं पाहिजे कारण नाहीतर दर मिनटाला f***k off , चू** , भें***अशा शिव्या देत वावरणारी गर्दी पहिली असती , मूर्ख frustration हवेत तरंगताना दिसले असते , इतक्या इतक्या गोष्टीवरून डोकं फिरणारे मी ,तू , ते .....दिसले असते .ह्या साठी केल्या असतील गोष्टी लोकांनी ? त्यांच्या ही वेळेला केल्या जाणाऱ्या गोष्टी स्वार्थ म्हणून केल्या गेल्या .मग ते मरणे का असो किंव्हा सत्याग्रह करणे असो ,जन्मठेप भोगणं असो ...ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी केल्या ते जगाचं कल्याण करायला नव्हेच .....'स्वतःसाठी म्हणून '. पण मधल्या काळात पुलाखालून पाणी बरेच वाहून गेलं ...आणि आता उरले ते बड्या घरचे पोकळ वासे .

 पूर्वी ही लोक यायचे एकत्र , रामाच्या काळी सुद्धा ,अगदी दंतकथा समजून उदाहरण द्यायचं झालं ,तरी माकडांनी सुद्धा पूल बांधला .पण आता शेतकऱ्याच्या मुलांची मोळी सुटलेली लाकडाची नी सगळेच सुटे विस्कळीत झालेले .! आता फक्त शब्दांचे ढग जमतात पण त्याच्यात पाणी नसतेच ....आता अधू झालेल्या नजरांना end of season चे sales दिसतात ,macdy , domino's , pizza hut मधून ढेकर देऊन बाहेर पडल्यावर कुठला तरी पूर नी कुठल्या तरी दुष्काळाला कुठाय जागा ?

 काल आज मध्ये एक दोन गोष्टी पहिल्या नी बरीच भीती वाटली .माझ्या बहिणीच्या hostel मध्ये एक 'चर्चा' ! विषय एक मरायला टेकलेलं कुत्र्याचं बारीकसं पिल्लू आणलेय, "ते असावं नी नसावं" ह्यावरची प्रदीर्घ संवाद सत्रे .. नी मग मला साक्षात्कार झाला की देवयानी , भाग्यलक्ष्मी , चार दिवस सासूचे , आणि जगण्याशी साधारण संबंध नसलेल्या सिरिअल्स का चालत असतील !

 वेळ खूप आहे खूप जणांना आणि त्याचे काय करायचे ते नेमके ठरवता आलं नाही की "कुत्र्याचे पिल्लू" हा मिटिंग भरवण्या इतका मोठा विषय होतो . रात्री ९ ३० ते १ ३० ह्या प्रदीर्घ कालावधीत सगळ्यात हुशार वागलं ते तर ते छोटूसे पिल्लू ...लोकांना बोलताना बघून ते शांतपणे एका टोपलीत जाऊन बसले नि वसा वसा भांडणारे लोक, एकमेकांच्या अकला काढून पांगल्यावर बाहेर आलं . त्याचे केस , त्याचा वास , त्याची शी शु ह्यानं कदाचित economics ह्या विषयावर post graduation करायला भारतातल्या विविध भागांतून आलेल्या मुली जीव गमावू शकणार अशी परिस्थिती निर्माण झालेली ..

 एकी कडे ह्या मुली नि दुसरीकडे त्या पिल्लाला कोणीतरी खाईल , ते मरेल ह्या काळजीनं जरा जास्त व्याकूळ झालेल्या मुली ....एकत्र आल्या ...तात्विक चर्चा , टोमणे , भांडणं ह्याचा एक जंगी कार्यक्रम केला ..आणि एकमेकांना bitches म्हणत आपल्या खोलीत गेल्या ...ते पिल्लूच काय खरे तर इतका विखार पाहून अजून थोडा वेळ ते चर्चा सत्र चालले असते तर मी ही मेले असते !

 बरे त्या कुत्र्याचा त्रास होणारे बाकीच्यांना being humanबद्दल सुनावत होते आणि कुत्र्याची काळजी असणारे काळजीत ग्रस्त होते . मला दोघांची काळजी वाटली .तशी मला माझीही वाटतेच . एकदम त्या कुत्र्याशी relate केलं मी !घाबरलेले ते नी बिचकलेली मी . निर्णय क्षमता आणि tolerance level ह्या इतह्या इतक्या चिंधड्या उडलेल्या !

 जग इतकं फक्त आपल्यापुरता होऊन जातं कि त्यात बाकी काही बरोबर असायला नी ते मान्य करायला जागा च नाही उरलेली .सगळी कडे राडा नी traffic jam ... आणि असे एका कुत्र्याचे काय करायचे ह्याच्या conclusion ला न येऊ शकणारे लोक देशाची धुरा वगेरे वाहणार ....!

 दुसरा प्रसंग तर आणखी गमतीशीर .

आज पुण्याहून मुंबई ला घाई घाई त यायला लागलं .. ७ १४ ला स्टेशन ला पोचले नी ७ १५ ला ट्रेन सुटायची . समोर य रांग ..फार विचार न करता ट्रेन मध्ये शिरले . म्हटलं सरळ T.C.ला गाठून fine भरूया . एक जागा तर मिळेलच! T.C. नं pass holder ladies boggie मध्ये पावती करून एक जागा दिलीन बसायला .

एका एका अक्ख्या बाकावर एक अशा पहुडलेल्या समस्त स्त्रिया अन्याया विरुद्ध पेटून उठल्या आणि असे कसे तुम्ही देऊ शकता जागा , नियमात बसत नाही म्हणून त्यांनी T.C. ला घेरले . "एक मुलगी नाही की एकदा adjust करून घेऊ शकत , गर्दी ही नाहीये", असे त्याने म्हटल्यावर त्यांनी त्याला त्या कशा पाहते ४ वाजता उठतात , त्यांना कसे काय काय करावे लागते , त्यांच्यावर अन्याय होतो , असे दमदाटीने बजावले . T.C. ही इरेला पेटला ..बघतोच मी कसे उठवता तुम्ही तिला तिथून असे म्हणून तो ही तिथे च कोट वगेरे काढून माझ्या साठी थांबला .'तो तिथून गेला की मग ' ? ह्या कल्पनेने मला थोडा घाम फुटला.

आजूबाजूला अनेक मतप्रवाह दिसत होते .काही बायका आडव्या पडून वाद ऐकत होत्या .मधेच डोळा ही लागला असावा काही जणींचा .काही जणींना मी म्हणजे समाजाला निर्माण झालेला धोका वाटायला लागले . काही जणींनी माझ्या नी T.Cह्या घराण्याचा , आई बाबांचा उद्धार वगेरे केला .माझी full on फाटली होती . मधेच एका बाकावर उभे राहून "अहो मूर्ख बायकानो , कान नी डोळे उघडा न जरा .आपापल्या वैतागातून , न जमलेल्या गोष्टींच्या त्राग्यातून , मोडलेल्या झोपेतून बाहेर येऊन ऐका न ,बघा न आजूबाजूला '? असे म्हणायची इतकी खाज येत होती आणि तेंसे केलं तर लोणावळ्याच्या खाई त d end होईल ह्याची ही खात्री होती .

 कौतुक वाटलं ते मला त्या T.C.चं . तासभर त्यानं खिंड लढवली खरी पण त्याला बाकीचीही कामं होतीच ...मग एकदम उठला ...माझ्या बाजूला आला नी म्हणला .....coffee प्यायची ?चल .....ह्या बायका मरुदेत ....

जाताना माझ्या समोर एक भीम काय आकाराची महिला पाय अडवून आली नी म्हणली "आमच्या डब्यात थांबायचे नाही" .मी म्हणले ,नै ते बरोबर आहे , पण मला माझ्या पायांनी बाहेर जायचे असेल तर तुम्हाला तुमचे पाय बाजूला करावे लागतील न ....?"

 जीव मुठीत धरून मी बाहेर आले ..पंजाबी होता T.C. आम्ही तीन चार डबे पुढे आलो..तो मला म्हणला ,'एक मिनिट थांब'.त्याने गाडीचा दरवाजा उघडला नी एक मोठ्ठा दीर्घ श्वास घेतलान ....थोडा relax करता हू ...फिर चलते हे असे म्हणून मग तो मला deccan queen चा famous cheese toast नी coffee साठी घेऊन गेला .

त्याच्या जोडीने दोन बंगाली , एक यु पी चा असे आणखी दोघे जण होते . breakfast साठी त्याची वाट पाहत थांबलेले . "कुछ पंगा हुआ क्या "? असे त्याची विचारल्यावर ह्या जसपाल नावाच्या बहादूर T.C. ने त्यांना रामकहाणी सांगितली .आमच्या सगळ्यांच्या मस्त गप्पा झाल्या . खूप च विरळ oxygen मधून भरपूर झकास oxygen आल्या भागात गेले . हवा खेळती होती . लोक मोकळे होते .

 एक जण त्यांच्यातला कविता करतो छान असे दुसऱ्यानं सांगितलं . ..एकानं मला एका सिनिअर T.C. च्या send off party हे निमंत्रण दिलेन .तो सहज बोलता बोलता म्हणला ..वाईट वाटून घेऊ नका ..."पण औरते कमिनी होती हे ...मुझे तो डर लगता हे ...में तो कभी उनसे पास टिकट न भी हो ....कुछ बोलता नही ...क्या पता बाद में क्या complaints कर दे ..लोग तो औरत को सपोर्ट करते हे ....आप लिखो कुछ औरते जो अत्याचार करती हे उस के बारे में "!
 मला त्यांच्यात आल्या नन्तर पुन्हा त्या hostel मधल्या कुत्र्याशी relate करावं वाटलं ...चांगल्या अर्थानं ..तिथे ही सगळ्या विरोधाला पुरून उरून त्याची कड घेणाऱ्या मुली होत्या आणि इथे ही त्या सगळ्या बायकांपासून मला वाचवणारा जसपाल होता .. पण काळजी वाटली .. वाटलं की नेहमी नसेल असे कोणीतरी सोबत कोणाच्यातरी .
इतका राग कसला खदखदतोय लोकांमध्ये ?
पुण्यात रिक्षावाल्यांना भर सकाळी ११ वाजता ही एखाद्या ठिकाण हून परत यायला passenger मिळणार नाही म्हणून half return का हवा असतो हक्क म्हणून? ट्रेन मध्ये उभ्या राहिलेल्या माणसाला बसलेल्यान्बद्दल आपसूक चीड का आलेली असते ?
 बरेच बरे नाहीये आपल्या लोकांना . "लगे राहो मुन्नाभाई "मधले संवाद आठवले .."अरे मामू , वो बेचारा बहोत बिमार हे ..उसे ग्रीटिंग भेजो ...बोलो ....get well soon". I just can stop thinking about those 3 words ...."get well soon'.!

No comments: